Tuesday, 27 November 2018

मावळतीचा सुर्य


   या धकाधकीच्या जीवनात मावळतीचा सुर्य पहिला की , दिवसभराचा थकवा निघून जातो .आपल्या जिवंत पणाची जणू तो साक्षच देत असतो ..आताची जीवनपद्धती पाहता सकाळी घरातुन बाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी पोहो चेल ना याची धास्ती लागलेली असते .पण हा मावळतीचा सुर्य जगणं सोपं करून  जातो ...

  

Sunday, 18 November 2018

काळ आलाय ...पण ..?

       काळ बदलला पण परिस्थितीत पुन्हा तीच यायला लागलीय .पूर्वी जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा सगळे एक होवून लढत होते .शिवाजी महाराजांच्या काळात पण सर्वांनी एकीने लढा दिला आणि किल्ले काबीज केले .आजूनही जेव्हा पाकिस्तान आपल्यावर अरेरावी करतो, तेव्हा आपण  सगळे एक होतो .
              खरंच कौतुक आहे ना माझ्या देशाचं दुःखात एक होतात .आजही जेव्हा केरळ वर नैसर्गिक संकट आल ,तेव्हा सगळी राज्य ..म्हणजेच सगळे भारतीय एकत्र येवुन मदत करत होते. खरंच अभिमान वाटतो मला की , मी या देशाची नागरिक आहे ...पण..
             जेव्हा सगळ्यांचं सगळं चांगलं चाललेलं  असलं ..बर म्हणुया हवं तर ..सगळ्यांचं सगळं बर चाललं असलं की अचानक एखादी ठिणगी पडते ...आणि आत्महत्या ,उपोषण ,खून ,मारामाऱ्या ,बलात्कार अश्या बातम्या डोकं वर काढतात ..आणि आपला देश ..माझा देश पुरा हतबल होवून जातो ,,तोच माझा देश ज्या ने हजारो जाती धर्माचे ,हजारो भाषांचे ,हजारो परंपरांचे ,वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकत्र बांधलेत .....
       हे अस का होवू लागलंय .अश्या बातम्या का येतायत ..जेव्हा देशाबाहेर  देशाच्या सीमेवर शांतता असते ...तेव्हा आपल्याकडे अनेक कारणं सापडतात पेटून उठायला ...जरा आत्मपरीक्षण करूया ..आणि खरंच आपल्या देशाला जे वेगळेपण मिळालं आहे ते जपुया .खरंच आपण पुण्यवान आहोत ..आपण या मातीत जन्म घेतला ..तिन्ही बाजूंनी सागराची साथ आणि डोक्यावर खंभिर पणे उभा असलेला हिमालय ...ही आपली शक्ती स्थान आहेत ...बाकी सगळं विसरून एक होवू या आणि या निसर्गाला वाचवूया ..निसर्ग अचानक काय करू शकतो हे तामिळनाडू मधील गज वादळ ,त्सुनामी ने दाखवून दिलंय ..तेव्हा मात्र आपण एकाच छताखाली मिळालेल्या आश्रयात राहतो ,एकाच ताटात  जे मिळेल ते खातो तेव्हा  कुठे जाते आपली जात आणि आपला धर्म ..तेव्हा असते  ती  फक्त माणुसकी ची जात आणि आपुलकीचा धर्म .. हिच वेळ आहे आपल्या सगळ्यांना एक होण्याची , नाहीतर एक  दिवस निसर्ग आपल्याला एकत्र आणेल ....
  (स्वाती प्रशांत गुरव )

Monday, 12 November 2018

सुखाची व्याख्या

सुख म्हणजे नक्की काय असतं  ..
सगळ्यांचं सगळच खूप छान चाललंय.कपडे खरेदी झाले , नवीन कपडे घालून पण झाले ,फटाक्यांची खरेदी झाली , अतिषबाजी पण झाली ,आकाशकंदील लावून घर सजवून पण झालं ,छान आखीव रेखीव रांगोळ्या आणि त्याचे छान फोटो पण काढून झाले ... आता पुढे काय ?
      परत आता नेहमीच रूटीन चालू होणार सगळ्यांची पैसा कमविण्यासाठी धावपळ .पण ..हा पण एक बरच काही सांगून जातो ........परवा काही कारणाने प्रवास झाला . प्रवास ऐन दिवाळीत झाला ..त्यामुळे जाण्याच्या आणि येण्याच्या मार्गावरची दिवाळी पाहता आली .छान सजलेली घर .आखीव रेखीव रांगोळ्या ,सुंदर तोरणं ..अगदी डोळ्यात साठवाव अस सगळं . पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नजर वळली ..आणि मन एकदम निराश झालं ..गावाच्या बाहेर मोकळ्या मैदानात छोट्या छोट्या झोपड्या दिसल्या .बाहेर चुलीवर स्वयंपाक करत असलेल्या बायका ..झोळीत मुल .आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघणारी त्यांची मुलं ...थंडीत कुडकुडत असणारी पण मनाने खंबीर झालेली हि माणसे ...यांना नसेल का दिवाळी करावीशी वाटत ..नवीन कपडे घालून फिरावस नसेल का वाटत ..मनात विचारांनी  थैमान घातलं .पाहताना अंगावर काटा येतो . तर जगताना कसं वाटत असेल ..तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं .पण आपण खुश आहोत..आपण फक्त मनासारखं झालं कीच खुश असतो पुढे थोडी अवघड वाट लागली की परत आहे त्याच ठिकाणी येतो ..लगेच नाराज होतो ..पण जर आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर सुख म्हणजे नक्की काय असतं ते कळतं ..जे मिळवायचं नसतं , फक्त अनुभवायचं नसतं तर ते मानायच  असतं ....आपल्या विचारात आपलं सुख असतं ..आपल्या वागण्यात सुख असतं ..आपल्या बोलण्यात सुख दडलेले असतं ..नकळतपणे आपल्यातच सुख दडलेले असतं ,जे शोधायचं नसतं , समोरच्याला द्यायचं असतं ..मग आपोआप आपल्याला अनुभवता येत .हेच जीवन आहे..
(स्वाती प्रशांत गुरव )

Sunday, 28 October 2018

           


 माझा गाव
   खरं तर हे लिखाण करायला तसा उशीरच झालाय ..अस एक ठिकाण की जे जगाच्या नकाशात आपलं नाव उमटवू पाहतंय ..ते ठिकाण म्हणजे  माझे गाव ....सुंदर  निसर्ग , धरण , अभयारण्या ने वेढलेले माझे गाव .
     मागे काही दिवसांपूर्वी गावी जाणं झालं .नवरात्री चे दिवस होते .आमच्याकडे नऊ दिवसांचा उपवास करणाऱ्या महिला देवीच्या मंदिरात नऊ दिवस राहतात .मंदिरात आम्ही प्रवेश केला आणि सर्व उपवास करणाऱ्या महिलांकडे पाहिलं तर त्याच्या विविध विषयांवर गप्पा चाललेल्या होत्या ..पण ऊपवसाचा थकवा कुठे जनवला नाही .
        गावात शांतता होती .गावातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून त्यामुळे बऱ्यापैकी आर्ध गाव तरी शेतात होत .नाचणी ,आन भाताचे पीक घेतलं जात .तसा आमचा भाग म्हणजे कोकणची सुरुवात ..लाल माती ,हिरवीगार झाडी ,मुबलक पाणी अस निसर्गाची सर्व वरदान लाभलेलं माझ गाव .
गावातील तरुण मंडळी मुंबई ला नोकरी निमित्त गेलेली.आणि बाकीचे तरुण आमच्या चांदोली अभयारण्यात आणि धरण क्षेत्रात कामाला ..जे मिळालेले आहे त्यात सुख आणि समाधान मानणार माझ गाव .
 गावाच्या डोंगर भागात ताड आणि माडाची झाड .शेजारी शेवताई देवीच मंदिर झाडांनी अच्छा दलेल .जणू देवीवर सर्व झाडा झुदुपानी सावली धरलेली .डोंगरावर पवनचक्की ची पाती घर घर आवाज करत होती .
        चांदोली अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे आमच्या गावच प्रमुख वैशिष्ट . चांदोली अभयारण्य जेव्हा आतून पाहायला मिळालं तेव्हा कोणत्यातरी वेगळ्या जगात आल्याचा भास होत होता ...प्राण्याचं जग ..त्यांच्या माहितीचे बोर्ड ..आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणवठा ..खूप शांततेचं ठिकाण फक्त पक्षांच्या किलबिलाटा चा आवाज ..तिथे प्राण्यांच्या निरिक्षणासाठी केलेली एक छोटी खोली होती त्यातून पणावाठयवर येणाऱ्या  प्राण्यांची गणना  करण्यासाठी मदत होते .
  जंगलच्या मध्यभागात एक उंच माची होती ..त्यावर जेव्हा चढून उभी राहिले ..तेव्हाचा नजरा काही वेगळाच ..अका बाजूला झाडीने अच्चदालेला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दिसणारे धरणाचे पाणी .एक अप्रतिम निसर्ग दृष्य ! खरच अभिमान आहे मला हे गाव माझ सासर म्हणून लाभलं .जीवाला जीव लावणारी माणसं गेलो की काही ना काही तरी जवळ जे असेल ते खुशीने देणारी ..माझी माणसं माझा गाव .. म्हणजे मनदुर तालुका शिराळा ,जिल्हा सांगली ( स्वाती प्रशांत गुरव )










Friday, 26 October 2018


स्त्री कालची आजची आणि उद्याची -
       डिलिव्हरी रूम मधून बाळाच्या रडण्याचा  आवाज आला , की बाहेरचे कान टवकारून बसलेले नातेवाईक उठून दरवाजा जवळ येतात आणि लगेच आतून आवाज येतो मुलगी झाली .हा आवाज ऐकला की त्या मुलीच्या बापाचं काळीज मोठं होत ,तर काहींचे नाराजीचे सूर उमटतात .आणि एकीकडे आणखी एक स्त्री, जीवनाच्या या संघर्षात उतरण्यास तयार झालेली असते.संघर्ष हा शब्द स्त्री चे आयुष्य व्यापून टाकतो .जन्मापासून ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त संघर्ष .संघर्ष स्वतःचा स्वतःशीच , बदलत्या विचाराशी ,बदलत्या समजाशी ,पर्यायाने जगाशी .आणि या त तिला धाडस देण्याचं काम करतात ते दोन जीव एक आई आणि दुसरा वडील .तिच्या वाट्याला आयुष्यात जे सुखाचे क्षण येतात त्याचा फार मोठा वाटा हा फक्त आणि फक्त आई वडिलांचा असतो .या दोन महान निर्मात्यांना शतशः प्रणाम .....
      जन्मानंतर जेव्हा लहानग्या मुलीला घरी आणतात तेव्हा दोन्ही प्रकारचे प्रतिक्रिया व्यक्त होत असतात .पुढे ही मुलगी जेव्हा मोठी होत असते तेव्हा भावाबरोबर खेळताना कायम स्वतः हारून भावाला जिंकवाव लागत .शाळेला गेली आणि परत यायला उशीर झाला की तिच्यावर प्रश्नांचा बधिमार व्यायला सुरुवात होते . तिथपासून तिच्या खऱ्या आयुष्याला आणि डोक्यात निर्माण होणाऱ्या वादळाला सुरुवात होते .की आपल्यालाच का विचारलं जातं मुलांना का नाही , आपल्यालाच का बंधन मुलांना का नाही .आताची बाहेरची परिस्थिती बघता मुलींना अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत बॉडीगार्ड ची गरज आहे असाच म्हणावं लागेल ..आणि खरंच आहे ते .
      असं नक्की काय झालंय की , मुलींना इतकं घाबरून रहाव लागतंय ,बाहेर पडताना जीव मुठीत धरून जावं लगतय ,कोण जबाबदार आहे याला ? राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले यांच्या काळात एवढ्या गंभीर समस्या नावत्या  स्त्रियांना मग हे आताच का ? का आपल्याला एकटी रात्री त भयाण अंधारात कधी जावे वाटले तर जाता येत नाही आणि चुकून उशीर झालाच तर घरी परतू का नाही जगू का मरू अशी  अवस्था होते मुलं निर्भिडपणे रात्री अपरात्री कुठेही फिरू शकतात पार्ट्या करू शकतात ..कारण ती मुलं आहेत .
           मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कागदोपत्री नष्ट झालाय .पण वास्तविक पाहता स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत त्यावरून ...एक स्त्री म्हणून तिच्याकडे फक्त फक्त वाईट नजरेनेच,स्वार्थी नजरेनेच  पहिले जाते .जोपर्यंत समाजाची ही नजर बदलत नाही तोवर स्त्री पुरुष समानता झाली ...अस म्हणत येणार नाही.
    आज जेव्हा मुलीला तिच्या पायवर उभ केल जात आणि लग्न करून सासरी पाठवलं जात तेव्हा तिच्याकडून सगळच परफेक्ट यावं ही अपेक्षा असते .तेवढ्यात पुन्हा आई होन आल ..आपसूकच त्यातून जबाबदाऱ्या वाढतात .आई सून मुलगी बायको म्हणून  कुठे कमी  पडायची संधी नसते ..जमलच पाहिजे.आजच्या जास्त पगार कमावणाऱ्या मुली स्वतःला हवं तसं राहतात जगतात मग त्यांचं काय चुकलं .स्वतःला हवे ते ,पण अंगभर कपडे घातले तर लोकांना काय त्रास होतो . स्त्री च आयुष्य बदलणं हे स्त्री च्याच हातात आहे .. सैरभैर उधलायच की , आपलाच लगाम आपल्या हातात घट्ट पकडून चालायचं . आणि हे जमलं नाही तर , होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला समोर जायचं .आतापर्यंत स्त्री वरील अत्याचाराच्या घटना कुठेतरी दूरवर परराज्यात घडलेल्या ऐकायला यायच्या टीव्ही वर ऐकायला मिळायचे पण परत त्या आपल्या नेहमीच्या वृत्तपत्रात येवू लागल्या .हलू हलू अगदी आपल्या आसपास घटना घडली अस ऐकायला मिळू लागलाय .आपल्याला जर पुरुषांच्या बरोबरीत काम करायचे असेल ,मग ते क्षेत्र कोणतेही असो ,तर आपल्याला स्वतः मनाने आणि शरीराने खंबीर होण गरजेचं आहे . तरच आपलं घर ,समाज ,राज्य ,देश आपण या होणाऱ्या वाईट बदलांपासून वाचवू ..जर स्त्री स्वतः  बदलली तर  प्रत्येक स्त्री च्या  जन्म आणि मृत्यू या दोन्ही महत्वाच्या गोष्टींना समाज देश राष्ट्र सलाम करेल .
      

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...