काळ आलाय ...पण ..?
काळ बदलला पण परिस्थितीत पुन्हा तीच यायला लागलीय .पूर्वी जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा सगळे एक होवून लढत होते .शिवाजी महाराजांच्या काळात पण सर्वांनी एकीने लढा दिला आणि किल्ले काबीज केले .आजूनही जेव्हा पाकिस्तान आपल्यावर अरेरावी करतो, तेव्हा आपण सगळे एक होतो .
खरंच कौतुक आहे ना माझ्या देशाचं दुःखात एक होतात .आजही जेव्हा केरळ वर नैसर्गिक संकट आल ,तेव्हा सगळी राज्य ..म्हणजेच सगळे भारतीय एकत्र येवुन मदत करत होते. खरंच अभिमान वाटतो मला की , मी या देशाची नागरिक आहे ...पण..
जेव्हा सगळ्यांचं सगळं चांगलं चाललेलं असलं ..बर म्हणुया हवं तर ..सगळ्यांचं सगळं बर चाललं असलं की अचानक एखादी ठिणगी पडते ...आणि आत्महत्या ,उपोषण ,खून ,मारामाऱ्या ,बलात्कार अश्या बातम्या डोकं वर काढतात ..आणि आपला देश ..माझा देश पुरा हतबल होवून जातो ,,तोच माझा देश ज्या ने हजारो जाती धर्माचे ,हजारो भाषांचे ,हजारो परंपरांचे ,वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकत्र बांधलेत .....
हे अस का होवू लागलंय .अश्या बातम्या का येतायत ..जेव्हा देशाबाहेर देशाच्या सीमेवर शांतता असते ...तेव्हा आपल्याकडे अनेक कारणं सापडतात पेटून उठायला ...जरा आत्मपरीक्षण करूया ..आणि खरंच आपल्या देशाला जे वेगळेपण मिळालं आहे ते जपुया .खरंच आपण पुण्यवान आहोत ..आपण या मातीत जन्म घेतला ..तिन्ही बाजूंनी सागराची साथ आणि डोक्यावर खंभिर पणे उभा असलेला हिमालय ...ही आपली शक्ती स्थान आहेत ...बाकी सगळं विसरून एक होवू या आणि या निसर्गाला वाचवूया ..निसर्ग अचानक काय करू शकतो हे तामिळनाडू मधील गज वादळ ,त्सुनामी ने दाखवून दिलंय ..तेव्हा मात्र आपण एकाच छताखाली मिळालेल्या आश्रयात राहतो ,एकाच ताटात जे मिळेल ते खातो तेव्हा कुठे जाते आपली जात आणि आपला धर्म ..तेव्हा असते ती फक्त माणुसकी ची जात आणि आपुलकीचा धर्म .. हिच वेळ आहे आपल्या सगळ्यांना एक होण्याची , नाहीतर एक दिवस निसर्ग आपल्याला एकत्र आणेल ....
(स्वाती प्रशांत गुरव )
काळ बदलला पण परिस्थितीत पुन्हा तीच यायला लागलीय .पूर्वी जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा सगळे एक होवून लढत होते .शिवाजी महाराजांच्या काळात पण सर्वांनी एकीने लढा दिला आणि किल्ले काबीज केले .आजूनही जेव्हा पाकिस्तान आपल्यावर अरेरावी करतो, तेव्हा आपण सगळे एक होतो .
खरंच कौतुक आहे ना माझ्या देशाचं दुःखात एक होतात .आजही जेव्हा केरळ वर नैसर्गिक संकट आल ,तेव्हा सगळी राज्य ..म्हणजेच सगळे भारतीय एकत्र येवुन मदत करत होते. खरंच अभिमान वाटतो मला की , मी या देशाची नागरिक आहे ...पण..
जेव्हा सगळ्यांचं सगळं चांगलं चाललेलं असलं ..बर म्हणुया हवं तर ..सगळ्यांचं सगळं बर चाललं असलं की अचानक एखादी ठिणगी पडते ...आणि आत्महत्या ,उपोषण ,खून ,मारामाऱ्या ,बलात्कार अश्या बातम्या डोकं वर काढतात ..आणि आपला देश ..माझा देश पुरा हतबल होवून जातो ,,तोच माझा देश ज्या ने हजारो जाती धर्माचे ,हजारो भाषांचे ,हजारो परंपरांचे ,वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकत्र बांधलेत .....
हे अस का होवू लागलंय .अश्या बातम्या का येतायत ..जेव्हा देशाबाहेर देशाच्या सीमेवर शांतता असते ...तेव्हा आपल्याकडे अनेक कारणं सापडतात पेटून उठायला ...जरा आत्मपरीक्षण करूया ..आणि खरंच आपल्या देशाला जे वेगळेपण मिळालं आहे ते जपुया .खरंच आपण पुण्यवान आहोत ..आपण या मातीत जन्म घेतला ..तिन्ही बाजूंनी सागराची साथ आणि डोक्यावर खंभिर पणे उभा असलेला हिमालय ...ही आपली शक्ती स्थान आहेत ...बाकी सगळं विसरून एक होवू या आणि या निसर्गाला वाचवूया ..निसर्ग अचानक काय करू शकतो हे तामिळनाडू मधील गज वादळ ,त्सुनामी ने दाखवून दिलंय ..तेव्हा मात्र आपण एकाच छताखाली मिळालेल्या आश्रयात राहतो ,एकाच ताटात जे मिळेल ते खातो तेव्हा कुठे जाते आपली जात आणि आपला धर्म ..तेव्हा असते ती फक्त माणुसकी ची जात आणि आपुलकीचा धर्म .. हिच वेळ आहे आपल्या सगळ्यांना एक होण्याची , नाहीतर एक दिवस निसर्ग आपल्याला एकत्र आणेल ....
(स्वाती प्रशांत गुरव )
Power of Unity...
ReplyDeleteUnity is strength of nation
ReplyDeletenakkich. ..kharach ata khup garaj. ahe ektechi
ReplyDeleteहो...बरोबर आहे..लोकांना एकत्रीकरण अणि धृवीकरण करण्याची ताकद फक्त धर्म मधे आहे...आपण एकत्र येवू..
ReplyDeleteIt is very nice article.
ReplyDeleteखूपच छान लिहिले आहे... असं लिहित रहा नवनवीन विषयावर... Keep it up... Waiting For your next article.. :)
ReplyDeleteA great point of view
ReplyDeleteNice effort for being United.Proud of you.
ReplyDelete