Monday 12 November 2018

सुखाची व्याख्या

सुख म्हणजे नक्की काय असतं  ..
सगळ्यांचं सगळच खूप छान चाललंय.कपडे खरेदी झाले , नवीन कपडे घालून पण झाले ,फटाक्यांची खरेदी झाली , अतिषबाजी पण झाली ,आकाशकंदील लावून घर सजवून पण झालं ,छान आखीव रेखीव रांगोळ्या आणि त्याचे छान फोटो पण काढून झाले ... आता पुढे काय ?
      परत आता नेहमीच रूटीन चालू होणार सगळ्यांची पैसा कमविण्यासाठी धावपळ .पण ..हा पण एक बरच काही सांगून जातो ........परवा काही कारणाने प्रवास झाला . प्रवास ऐन दिवाळीत झाला ..त्यामुळे जाण्याच्या आणि येण्याच्या मार्गावरची दिवाळी पाहता आली .छान सजलेली घर .आखीव रेखीव रांगोळ्या ,सुंदर तोरणं ..अगदी डोळ्यात साठवाव अस सगळं . पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नजर वळली ..आणि मन एकदम निराश झालं ..गावाच्या बाहेर मोकळ्या मैदानात छोट्या छोट्या झोपड्या दिसल्या .बाहेर चुलीवर स्वयंपाक करत असलेल्या बायका ..झोळीत मुल .आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघणारी त्यांची मुलं ...थंडीत कुडकुडत असणारी पण मनाने खंबीर झालेली हि माणसे ...यांना नसेल का दिवाळी करावीशी वाटत ..नवीन कपडे घालून फिरावस नसेल का वाटत ..मनात विचारांनी  थैमान घातलं .पाहताना अंगावर काटा येतो . तर जगताना कसं वाटत असेल ..तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं .पण आपण खुश आहोत..आपण फक्त मनासारखं झालं कीच खुश असतो पुढे थोडी अवघड वाट लागली की परत आहे त्याच ठिकाणी येतो ..लगेच नाराज होतो ..पण जर आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर सुख म्हणजे नक्की काय असतं ते कळतं ..जे मिळवायचं नसतं , फक्त अनुभवायचं नसतं तर ते मानायच  असतं ....आपल्या विचारात आपलं सुख असतं ..आपल्या वागण्यात सुख असतं ..आपल्या बोलण्यात सुख दडलेले असतं ..नकळतपणे आपल्यातच सुख दडलेले असतं ,जे शोधायचं नसतं , समोरच्याला द्यायचं असतं ..मग आपोआप आपल्याला अनुभवता येत .हेच जीवन आहे..
(स्वाती प्रशांत गुरव )

No comments:

Post a Comment

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...