Sunday 2 December 2018

नशिब

प्रत्येकाला देव सगळंच देतो असं नाही ,,कुणाला एखादी गोष्ट जास्त तर अखादी कमी..ज्याला जास्त मिळालंय त्याने कधी गर्व करू नये आणि कमी मिळालंय त्याने कधी कमीपणाचे दुःख करू नये ,,मी धन धान्य पैसा अडका याबद्दल मुळीच बोलत नाही ,,तर आपल्याला देवाने दिलेली खरी देणगी आहे ती म्हणजे आपले शरीर .........ज्याला सगळं व्यवस्थित मिळालं.त्याला त्या शरीराचे महत्व कधी जानवतच नाही .उलट ज्याला   एका पायाने आणि अका हातात कुबडी घेवून चालावे लागते ..एखाद संकट आलं की लोक सुरक्षित ठिकाणी पळतात ,दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पळत असतात आणि अशात पाय नसणारा आहे त्याला  पायाचे महत्व विचारा,,ज्याला देवाने दोनी हाथ दिले ..तो हाताने सगळी कामे करतो पण ज्याच्याकडे नाही ,त्याला विचारा ,जेव्हा समोर पंचपक्वन आहेत आणि त्याला ,हात नाही म्हणून जेवता येत नाही, यासारखं दुःख ते काय ,,,,,,,राहिला डोळा ,,लोकांना चष्मे लागतात वयानुसार ,,टीव्ही बघून ,,कीवा मोबाईल सारखं बघून अस म्हंतल जात ..पण काहींना त्यांचा काही दोष नसताना ..देव दृष्टी कमी करतो ..जेव्हा प्रत्येक गोष्ट बघताना हाताने चाच पडावे लागते ..प्रत्येक गोष्ट अगदी एकदम जवळ जाऊन बघावी लागते ,,बुडत्याला काठीचा आधार तसा दृष्टी कमी असणाऱ्यांना चष्म्याचा आधार ..तसा तो आधारच जर सापडला नाही तर काय होईल..समोर पूर्ण  अंधार  आणि फक्त अंधार .....डोळा हा शरिराचा खूप खूप खूप महत्वाचं अवयव आहे ..त्याला जपा ...या डोळ्यांच महत्व अंधारात चाचपडत  डोळ्यांना मदत करणाऱ्या त्या हाताना विचारा .........ज्याला या परिपूर्ण शरीराची संपत्ती मिळाली तोच खरं श्रीमंत ...अशा सर्व श्रीमंतांनी आपली संपत्ती जपा  ...           स्वाती प्रशांत गुरव

No comments:

Post a Comment

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...