Friday 14 December 2018

मातीतल्या आठवणी ...
      ठेविले अनंते , तैसेचि रहावे ...याप्रमाणे जे काही देवाने दिलेले आहे त्यात समाधान मानून जगणारे लोकं.दुष्काळी भाग ,कोरडी माणगंगा नदी,नदीच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असलेले छोटंसं गाव .ज्या गावाने माझ्या बालपणीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत .आई च्या हाताला धरून याच मातीत चालायला शिकले .याच मातीत खेळले ,पडले आणि उभी राहिले ..

       याच गावाबद्दल थोडासा लिहिण्याचा प्रयत्न ..
वडिलांची बदली झाली आणि आम्ही गोंदवल याला आलो,,त्यापूर्वी कधी न पाहिलेले गाव .पण या गावाने इथल्या मायाळू माणसांनी आम्हा कुटुंबीयांना कधी आपलंसं केल कळलच नाही  आणि जवळ जवळ १३ वर्ष इथे राहायला  मिळालं..गावातल्या मध्यभागी मारुती च मंदिर आहे , त्याच्या जवळच एका वाड्यात आम्हाला राहायला जागा मिळाली .तेव्हा कुठे मी नुसती चालायला शिकलेले ...आजही हे लिहिताना तो वाडा त्या खोल्या डोळ्यासमोर येतायत. मंदिराजवळच छोटीशी बालवाडी होती तिथे मी जाऊ लागले .खूप आठवण येते अनिता बाई ,देशपांडे बाई ,आणि डब्यातून मिळणाऱ्या सुकडीची .पुन्हा १ ली ते ४ थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळे तला प्रवेश .तेव्हा अपुऱ्या जागेमुळे आणि शाळा दूर असल्याने आम्ही राहण्याचे ठिकाण बदलले ..आणि पुन्हा माझी जिवाभावाची मैत्रीण मेघा  भेटली ..मग आमचं दोघींचं शाळेला रोज बरोबर जाणं .बरोबर अभ्यास कारण चालू झालं ..कायम सोबत असायचो आम्ही .पुन्हा ते दिवस जगायला मिळावे असच वाटतं  अगदी .पहिली ते चौथी चारही ईयत्तेत आम्हाला एकच बाई होत्या रेमने बाई ..अतिशय कडक ..पण आज जे आम्ही आहोत ते आमच्या बाई न मुळे च .. खूप भीती वाटायची शाळेला जायची ..पण सगळं वेळच्या वेळी पूर्ण करण ..अभ्यासाचं नियोजन करणं ,स्वच्छ ता आरोग्य सगळं सगळं बाई न मुळे कळलं ..आणि आजही त्यांनी सांगितलेलं जसच च्या तास आठवतंय ..बाई आठवड्यातून एकदा हस्ताक्षर च्या स्पर्धा घायच्या ..त्यात पहिला नंबर मिळण्याची अमाची कायम धडपड  असायची ..शाळेत गेल्या गेल्या पहिला तास शाळेच्या आवारातील स्वच्छ तेचा असायचं नंतर प्रार्थना ..आणि वर्षातून  एकदा दवाखान्यातील लोक आमची आरोग्य तपासणी साठी यायचे तेव्हा माझी खरी परीक्षा असायची .तेव्हा मी शाळेत जायला तयार च नव्हते खूप घबरायचे ... पप्पा नी घरापासून अगदी शाळेपर्यंत मारत मारत नेलेले ..बार्शी करांच हॉटेल होत चौकात तिथे खूप लोक असायचे ..पप्पा नी मारत मारत नेल्यामुळे परत मला तिथून जायला खूप कसातरी  वाटायचं ..आणि बाई न मुळे शाळेची कधी अवड निर्माण झाली कळलच नाही .शाळेजवळ च दवाखाना होता ,पप्पा दवाखान्यात X.ray techinichian असल्याने त्यांना गावात सर्व ओळखायचे . आणि त्यामुळे मी पप्पा ना खूप घाबरायचे .काही दिवसांनी दवाखान्यात क्वार्टर मधे राहायची सोय झाली आमची .. ५ ते १० वी शाळा बदलली ..तिथे नव्या मैत्रिणी मिळाल्या आणि नवे शिक्षक .शाळेची प्रार्थना ,P E चा तास ,विविध गुण दर्शन कार्यक्रम त्यात आमचा रमेश काका नी बसवलेला ...डान्स ..मेरे देश की धरती ...त्याचा रोज एक तास सराव असायचा . प्रियांका ,रुपाली पार्वती ,नयना यांच्या बरोबर केलेला अभ्यास ,खेळ ,स्पर्धा न मधला सहभाग ..सगळं आजही तसच आठवतंय ...शाळेचं स्टेज आणि तिथे मी १० वीच्या निरोप समारंभात केलेलं भाषण ,,शाळेचं परिपाठ म्हणयला जाताना थरथरणारे पाय ,हो आणखी एक आठवण म्हणजे करा टे क्लास ..पहिल्याच बेल्ट च्या साठी आम्ही सगळे द हिवडी ल गेलेलो ...आणि माझा तो दिवस माझ्या karate class cha शेवटचा दिवस ..कारण येताना चशम्याच्या फुटलेल्या काचा हातात घेवून रडत रडत घरी आलेले .९ मधे असताना कन्याकुमारी उटी म्हैसूर ची आमची ट्रीप .त्यासाठी पापा thank you .ata ठरवून पण अशी ट्रीप परत काढणं जमलच अस नाही . आणखी एक आठवण म्हणजे आमचे योगा चे क्लासेस ..पहाटे दवाखाना ते देवळापर्यंत पळत योगा च्या क्लास ल खांडेकर सरांकडे यायचो ..त्या वेळी त्या काळी योगासन ,आणि इंग्रजी या दोन्ही टोकाच्या गोष्टींमध्ये पारंगत असलेली व्यक्ती म्हणजे खांडेकर सर .. सर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद .
     गावाच्या नदीला कधीतरी येणारा पुर आणि पूर बघण्यासाठी जमणारी गर्दी ...तेव्हाच  काय तो गाव नदीच्या दोन्ही काठाला उभ राहायचा .गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भरणारी यात्रा ..आणि उंच दही हंडी .हे गावच वैशिष्टय .गावात होणाऱ्या नाट्यस्पर्धा ..त्याच श्रेय रमेश काका नाच ..मला घेतलेली नवीन सायकल आणि त्यावरून मी प्रियंका आणि उज्वला अगदी पळशी  पर्यंत गेलेलो .पार्वती रानातला खाऊ अगदी मायेने प्रेमाने आणायची आणि आम्ही ही आवडीने खायचो ..
   खरंच परत भेटेल का हे सगळं अनुभवायला ..परत मिळेल का शाळेतला तो बेंच , बळवडीतली डब्या तली सुकडी ...गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये या माझ्या मातीत जाण्याचा योग आला .. तेव्हा मी पाहिलेला गाव आणि माझ्या आठवणीतलं गाव यात खूप फरक होता ..शाळेची जीर्ण झालेली इमारत पण त्यावर लिहिलेलं राष्ट्रगीत अजूनही तसाच होत..दवाखान्याचा मैदान आणि ते मोठं झाड ज्याखली आम्ही दिवसभर खेळायचो ..सगळं मोडकलय पण तो उंच डेरेदार वृक्ष दवाखणाच्या आव रात आजही तसाच तटस्थ पने उभा आहे ...जुन्या आठवणी कवेत  घेवून...
 (गावाचे नाव .. गोंदवले तालुका माण जिल्हा सातारा ) स्वाती प्रशांत गुरव 

3 comments:

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...