Monday 7 January 2019


जीवनाची परीक्षा 
ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श्वास ठेवलाय.
       एक छोटंसं कुटुंब पाच जणाच .परिस्थिती बेताची पण सगळे जिद्दीने जगणारे .दोन मुली आणि एक मुलगा छोटासा संसारचा गाडा आई वडील कष्टानं ओढत  होते  .तिन्ही मुल एकमेकांच्या हाताला पकडून शाळेला जाणारी ,एकमेकांची काळजी घेणारी , वडीला ना कमी पगार त्यात घरभाड आणि शिक्षण होण कठीणच होत.मुलंही  अतिशय कष्ट करणारी ,मुलगा आई ने तयार केलेले मेस चे डबे वेळेत देवून मग शाळेला जायचा ,दोन बहिणी आई ल पापड लाटायला मदत करायच्या ते विकून त्यातून शाळेचा खर्च भगवायचा .शाळेला इतर मुलांसारख दप्तर नाही म्हणून दोन्ही हातांनी घट्ट छातीशी कवटाळले ली वह्या पुस्तकांची  पिशवी लपवून न्याय ची ..वह्या म्हणाल तर मोठ्या दोऱ्याने शिवलेल्या .शाळेत जायचं तर शाळेचा युनिफॉर्म नीट नेटका लागायचा तिथेही जुना युनिफॉर्म कळेल म्हणून कुठेतरी एका बाजूला थांबायचं .पण   कष्टाला परिस्थितीला लाचार होणारी ही मुल कुठली  ,एकदा एका पाहुण्यांनी खाऊसाठी पैसे दिले या तिघा भावंडांनी ice cream खायची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं ,स्टँडवर जिथे रोज येताजाता मुलांना आईस क्रीम खाताना बघायचे तिथे या दोन बहिणी आईस क्रीम आणायला गेल्या पण पण त्या हातातल्या पैशात एकच आईस क्रीम येतंय हे कळल्यावर ते एक  आईस क्रीम घरी घेवून भावाला देवून स्वतच्या खूप दिवसाच्या आईस क्रीम खायच्या ईच्छे ल बाजूला सारून ..."आम्ही दोघींनी खाल्ल तुझंच  आहे हे  ,"  असे म्हणणाऱ्या बहिणी या व्यवहारी जगत सापडणं कठीण आहे ..घरात असेल ते वाटून घेवून खाणारी भावंड  ,कारण आईचे संस्कार च तसे होते ,कुणापुढे कधी हात पसरायचे नाहीत ..पण अभ्यासात कुणीच कमी नव्हत.तिघांचीही स्वतःची पुढे काहीतरी बनण्याची स्वप्न होती.
    अश्यातच मोठी मुलगी बघता बघता १८ वर्षाची झाली आणि तीच लग्न साध्या पद्धतीने नात्यातच लावून देण्यात आल ,परिस्थिती ची जान मनात ठेवून तिनेही लग्नाला होकार देवून,नवीन  आयुष्याला सुरुवात केली  ..हलू हलू दुसऱ्या  मुलीलाही  ही लग्नासाठी मागणी येवू लागली आणि एका चांगल्या घरात तीच लग्न ठरलं ..आणि जमेल तस खर्च करून तिचं ही लग्न लावून देण्यात आल..दोन्ही मुलींनी स्वतःची पुढे काहीतरी होण्याची स्वप्न बाजूला ठेवली.पण या दोघींचा भाऊ ..यान मात्र मनाशी निश्चय केलेला परिस्थिती शी युद्ध करण्याचा आणि ते युद्ध जिंकण्याचा ..ध्यास !!
       आता या कथेचा मुख्य सूत्रधार या दोन मुलीचा  भाऊ ..लहानपणापासून च वेगळं व्यक्तिमत्त ..! बालपण मनदूर  गावच्या मातीत गुरांच्या मागे काट्या कुत्यातून वाट काढत गेलेलं .शाळेला जायचं तर एक तास च चालणं असायचं .त्यातच लहानपणी मंडळाच्या गणपती ची आरास करताना ..लोखंडी शिडी च्या वरच्या पायरीवरून थेट खालच्या पायरीवर जोरात शॉक लागून पूर्णपणे बेशुद्ध होवून , १५ दिवस जीवन मरणाची झुंज देणाऱ्या त्या घटना .याची  साक्ष  म्हणजे चेहऱ्यावरील  हनुवटी वरील आजही दिसणारी  ती मोठी खूण ......
   हे व्यक्तिमत्त्व १२ वी ची परीक्षा पास झा, इजिनियर व्हायची याची खूप मनापासून इच्छा होती .पण  परिस्थिती आड आली आणि इंजिनअर होण्याचं स्वप्न B.C.A  la प्रवेश घेवून पूर्ण काऱ्यच त्यानं ठरवलं .झोकून देवून अभ्यास केला .आणि कुशग्र बुद्धिमत्ता मुळे शिक्षकाच्या आवडता विद्यार्थी बनला .ते ही शिक्षण चांगल्या मार्क नी पूर्ण केलं ..आणि एका खाजगी कंपनी मध्ये जॉब मिळाला .बाकीची मुल पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली .डिग्री हातात येवुन ही १० वी पात्रता असलेल्या स्तरावरील जॉब करत असल्याचे त्याच्या एका शिक्षकांनी पाहिले तेव्हा ते शिक्षक म्हणाले ,"तू एवढा हुशार मुलगा आणि हे काम का करतोय .पुढे शिक ,सगळी मुलं पुढील शिक्षणाला पुण्यात गेलीत त्यांची मदत घे .मी सांगतो त्या मुलांना ".
       दुसऱ्या दिवशी २ दिवसाची कामावरून सुट्टी घेवून हा पुण्याला गेला .जेवणासाठी पैसाची पुरती सोय नव्हती तर राहण्याचा प्रश्नच नव्हता .पण मित्रांची साथ लाभली आणि कशीतरी राहायची सोय झाली,काही कॉलेज मधे चौकशी केली पण कॉलेज चालू होण्यासाठी आणि अडमिशन साठी २ दिवसाची मुदत आणि त्यात  फी च आकडा ऐकून ,परत आहे त्या ठिकाणी आहे त्या जागी तेच काम पुन्हा सुरू झाल पण मनात विचारांचं थैमान चालू होत ..पुढं शिकायचंय .  .. नातेवाईकां कडे थोडी पैशाची व्यवस्था झाली ...कुणापुढे हात पसरायचे नाहीत हा संकल्प सोडण्याशिवय पर्याय नव्हता ..आणि बँकेत शिक्षणासाठी कर्ज मिळत अस ऐकलेल म्हणून थेट बँकेच्या maaneger कडे जाऊन सत्य परिस्थिती सांगितली .तिथेही नकार मिळाला ..उठून परत फिरणार अवढ्यात manager साहेबांनी मार्क लिस्ट दाखव असा आवाज दिला आणि पुन्हा बसा अशी आज्ञार आली ..थोडा काहीतरी आशेचा किरण दिसला ..आणि साहेबांचे शब्द काळजात घुसले ..," मी माझ्या मुलासाठी १ लाख रुपये बाजूला ठेवलेले पण त्याला तुझ्यावढे मार्क नाही मिळाले त्यामुळे या १ लाख ला काही किंमत नाही पण जर हे तुझ्या उपयोगाला आले तर तू हे इंजिनिअर झाल्या वर मला परत कर ....आयुष्याला कलाटणी देणारा हा क्षण !!!!
             पैसे भरले आणि कॉलेज जीवनात प्रवेश मिळाला .पोस्ट graduation नावाचं लेबल साठी  अवढा आटा पिटा .....साधी राहणी मुळे पुण्यातल्या शहरी कॉलेज च्या जगात ही आपलं स्वतचं व्यक्तिमत्व उठा वदार पने दिसणार..राहण्याचा ,जेवणाचा , शिक्षण आणि कर्जच ओाझ कमी करण्यासाठी याने नेट कॅफे मधे जॉब शोधला .कॉलेज सुटलं की कॅफे मधे पडेल ते काम करणं रात्री कॅफे बंद करणं ,सकाळी लवकर जाऊन कॅफे च मालक सांगेल ते ऐकान आणि परत दिवसभर कॉलेज ..अस सगळ जवळ जवळ २ वर्ष चाललं ..खूप ओढाताण ..जेवणाची आबाळ पण जिद्दी पुढं नियती ल ही झुकाव लागत म्हणतात ना तास झाल अगदी ..  कॅफे मालकाच्या घरी एकदा कार्यक्रम होता त्यासाठीची सर्व कामे मालकाने याला सा गीतलेली.याच्या प्रामाणिक पानावर आणि कामावर पूर्ण विश्वास ..आणि तोही सर्व चोखपणे पार पाडायचा ..रात्री उशिरा कॅफे मालकाच्या घराचा कार्यक्रम संपला आणि हा ही रूम वर जायला निघाला तेव्हा त्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना जाताना या मुलाला सोडा अस मालकाने सांगितलं ..हा गाडी मधे मागच्या सिट वर बसला आणि दोन तरुण पुढे बसलेले त्याच्या मधे सॉफ्टवेअर मधल्या काही गोष्टींची चर्चा चालू होती आणि त्यातली बरीच उत्तर या आपल्या हुशार मुलाने दिली ..आणि तीच ती पहिली संधी ...जी त्याची आयुष्य बदलणारी ठरली .......,...... पोस्ट ग्रॅज्युएशन होत असतानाच कमी पगाराची पण नवीन शिकायला मिळणारी ..आणि इंजिनायर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती संधी ...
       संधी आणि '  ती ' दोनी अकाच वेळी मिळाल्या .. ती म्हणजे  नातातलीच एक अशी की जिला याच्या सर्व कष्टाची  जाणीव होती , आता याच्याकडे काही नाही पण याच कर्तृत्व पुढे खूप मोठं असणार आहे हा विश्वास असणारी ती भेटली .आणि आयुष्याची साथीदार झाली ..आणि आज ७ जानेवारी २०१९ , सर्व स्वप्न पूर्ण होवून ,यांची दोन मुल त्यांच्या आजीआजोबा सोबत आनंदात वाढतायत ...दोन बहिणींनी ही स्वतच्या सासरतल्या जबाबदाऱ्या पार पाडून एक सरकारी खात्यात नर्स तर दुसरी एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे ..
           आज स्वतःच्या जिद्दीने ,कष्टाने ,त्यागाने आज हाच मुलगा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये manager पदावर काम करत आहे .आई वडील, बहिणी ,दोन मुल ,आणि बायको यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून ही त्या जुन्या उपकारांची रोज आठवण काढतोय ..आणि जो जो तरुण गावाकडून स्वप्न उराशी बाळगून पुण्यात येतोय त्यांना होईल ती मदत करायचा प्रयत्न करतोय .... या कथेतील अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या या सूत्रधारा च्या आयुष्याची जोडीदार होण्याचे भाग्य मला लाभले ..त्यातून हे मांडण्याचा प्रयत्न ...
       आताच्या जगात मोठं झाल्यावर मागची परिस्थिती क्षणात विसरून जातात लोक ..पण हा मुलगा त्याला मिळालेल्या प्रतेक मदतीला आजही मदत करतोय .आजही त्या शिक्षकांच्या ,नेट कॅफे चालवणाऱ्या काका नच्या ,बँकेतील मनेजर च्या चरणी नतमस्तक होतोय ज्यांनी मोठी सप्न दाखविली आणि ती पूर्ण करण्याची जिद्द दिली ..आणि त्या जिद्दीला पूर्ण होईपर्यंत साथ दिली ..  (स्वाती प्रशांत गुरव )

आयुष्याचं गणित सरावाने जमत ,
पण कसं जमेल विचार करत बसलं तर अधुरच राहत .
आयुष्याच्या अभ्यासक्रमात दुसरा विषय नाही ,जमलं तर ठीक नाहीतर काट्या कुट्या न शिवाय पर्याय नाही .
काटे टोच तील म्हणून घाबरु नका ,रस्ता सरळच आहे .
पण मार्ग बदलू नका .  

Friday 21 December 2018

          वास्तव मनाला भिडलेल 
 भरलेले चार कॅन घेवून सायकल निघाली होती .खर तर ती सायकल छोट्या मुलाला घेवुन निघालेली अस म्हणू .कारण  एक छोटासा जीव ,त्याच्या वाजनापेक्षा च हे ओ झ घेवून सायकल हातात पकडुन ताकद लावून ढकलत घराकडे निघालेला ...मी त्याला पाठमोरा पहिला .अगदी पहिली दुसरीला मुलगा असावा असा विचार करत होते ,याला आज शाळा नसेल का किती अवघड काम सागितले आहे याला आई वडिलांनी ,,हा विचार करत होते तोच माझी गाडी त्याच्या बाजूने पुढे निघाली आणि पाहिले तर हा छोटा शंतनु .. आमच्याकडे कामासाठी ज्या ताई येतात त्यांचा मुलगा .गाडी थांबवली आणि त्या ला विचारलं मदत करू का बाळा .चल कॅन  घरी ठेवून येवू आपण ..आणि का रे शाळेत का गेला नाही .
तो म्हणाला ,"अग दीदी ,शाळेतून च आलोय आता जेवणाची सुट्टी झाली तोवर घरी जाऊन पाणी भरून होईल म्हणून आलो ,हे कॅन घरात ठेवून परत जातो शाळेत ."
      दुसरी तला मुलगा केवढा हा समजूतदार पणा. तिथेच विचार करत होते आणि हा मुलगा घरी जाऊन कॅन ठेवून पुन्हा शाळेला निघालेला ."दीदी अजून इथेच होय गेली नाहीस काय ", तेव्हा मी विचार चक्रातून बाहेर आले .आणि त्याला म्ह ट लं चल काहीतरी खाऊ घेवून देते .जेवण केलं का तू ,त्याने हो म्ह  ट ल आणि तरीही माझ मन राहवलं नाही आणि त्याला मी बेकरी तून थोडा खाऊ घेवून दिला .त्याने पण तो लगेच घेतला कारण खरंच त्याला भूक लागलेली .
            घरी पोहोचले कामवाल्या ताई ना म्ह ट ल ,शंतनु भेटलेला पाणी भरत होता .तेव्हा ती माऊली म्ह ट ली ,"अग पोरगं ऐकतच नाही .काम करू नको म्ह ट ल तरी .मी घरी जस्तोवर घर आवरून भात केलेला अस तोय .परवा शाळेत बोलवून घेतलेलं , म्हणलं यान आणि काय केलं काय ठाव ,तर बाई म्हणल्या पोरगं हुशार आहे स्कॉलरशिप ,च्या तासाला लाव .म्या हो म्हणाल आणि घरी आले, तर पोरगं म्हणताय काय तास ने लावायचा मला, माझा मी अभ्यास करतुया .तू लय डोक्याला ताप करून घेवू नग. मग म्याच म्हणलं करुदे काय करायचं ती चार पैस पोटाला कमवल म्हणजे बास .सावलीत बसून करायचं काम मिळालं म्हणजे बसं ".
          हे त्या माऊलीचे बोलणं ऐकून मी पुन्हा विचारात गुंग झाले .आपण आपल्या मुलांना डॉक्टर इंजनीयर होण्याची स्वप्न दाखवतो .त्यांच्याकडून अपेक्षा करतो ,त्यांनी ती अपेक्षा पूर्ण करावी म्हणून त्यांचं सगळं ऐकतो हट्ट पुरवतो .पण पूर्ण होतात आपली स्वप्न .?.अचानक आवाज आला, मम्मी . ..माझा पाहिलीत इयत्तेत शिकत असलेला मुलगा टीव्ही बघत होता तहान लागलीय पाणी आणून दे म्हणून आवाज देत होता .... एका बाजूला दुपारच्या जेवणाच्या सुट्टीतला वेळ वाया जाऊ न देता  आणि  स्वतच्या आई ल त्रास होवू नये म्हणून दुसरी शिकत असलेला मुलगा दूरवरून पाणी भरतोय.किती खोल दरी आहे या दोन्ही मुलांच्या जगण्यात ... आणि जी आई कोणतीच अपेक्षा न करता पोटपुरत कमावलं म्हणजे झाल अशी म्हणणारी . ..  कसं सगळं जमवतात लोक .जे आहे त्यात सुखी .आणि अश्या परिस्थितीत सुधा न काही सांगता शिकवता कुठून  अवढं शहाणपण येत या कोवळ्या जीवांना .आज CBSE ,ICSE,HSC  board आणि क्लासेस च्या गप्पा मारणारे आपण ,हल्ली संस्कारांचे पण क्लासेस निघालेत तेही लावू कदाचित .परंतु परिस्थिती शी झगडून येणारी हुशारी ,या आपल्या मुलांना कधी कळणार देव जाणे !!!! ( स्वाती प्रशांत गुरव ) 

Wednesday 19 December 2018

एक अशी कथा ,की जिला सत्यकथा म्हणावं का भास हा प्रश्नच आहे ..पण अंधश्रद्धा मात्र मुळीच नाही ....
     दिवेआगर ट्रीप झाली ,परतीचा प्रवास चालू झाला ,कोणत्या मार्गाने पुणे घाठायच या वर चर्चा चालू होती .एक जवळचा मार्ग पण थोडा अवघड आणि एक दूरचा पण सुरक्षित .शेवटी जवळचा मार्गाने जायचं ठरलं .प्रवास चालू झाला पोटात भुकेने कावळे ओरडत होते ,लहान मुल सोबत असल्याने लगेच जेवायला थांबलो.जवळ जवळ एक तास त्यातच गेला ,पुन्हा प्रवास चालू झाला .अंधार दाटून आलेला .तीन तासात पुण्यात पोहोचू असा अंदाज होता .गाडीच्या लाईट लागल्या आणि रात्र चालू झाली .डिसेंबर महिना त्यात थंडीचे दिवस त्यामुळे गाडी च्या काचा बंद केल्या .पुढे ,पाठीमागे गाड्यांची रांग पुढे पुढे सरकत होती .सगळ्यांना घरी पोहोचायचे वेध लागले होते .
 गाडीच्या लाईट च मंद प्रकाश ,रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गर्द झाडीवर पडत होता .खूप गरम झालं म्हणून थोडीशी खिडकीची काच खाली केली ,आणि थंड वाऱ्याची झुळूक काचेतून आत येताना रातकिड्यांचा किर किर आवाज घेवून च आत आली ..अंगावर सर्रकन काटा आला थंडी ने का भीतीने .कुणास ठाऊक ...मागे नजर टाकली , घाट असल्याने अगदी कमी स्पीड मधे गाड्या चालू होत्या .गाडीत एकदम शांतता होती मुलांची झोप लागलेली ,पण आम्ही मोठे लोक जागे असूनही आपापल्या विचारात मग्न होतो ,जणू काही प्रत्येकजण सारखाच विचार करत असावं पण वातावरण अस होत की मोठ्यानं बोलणं सुचलच नाही कुणाला .विचार करत करत घाटाचा बराच टप्पा ओलांडला असावा .आता घा ट संपेल आणि पुण्याच्या लाईट दिसतील .असा विचार मनात आला आणि दीर्घ श्वास घेतला जणू काही एवढा वेळ मी श्वास थांबवलेला .अचानक ब्रेक मुळे गाडी स्लो झाली ,,,आणि माझी विचार भ्रमंती थांबली आणि सगळेच एकदम बाहेर पाहू लागलो .सहजच प्रत्येकाच्या तोंडातून शब्द फुटले ..काय गाडी चालवतात लोक ,साईड देता येत नाही का ! खूप वेळच्या प्रयत्नानंतर आणि कुशल ड्रायव्हिंग चे कसब असल्याने गाडी रस्त्याच्या खालून अगदी छोट्या जागेतून पुढे  काढायच चालू होत कशीबशी जागा बघून गाडी पुढे जाऊ लागली आणि आम्ही रागाने त्या वाट न देणाऱ्या एकदम सावकाश निघालेल्या ट्रक कढे बंद काचेतून रागाने पाहू लागलो आणि धक्काच बसला ..डोळे पाहतायत ते खरं आहे ना हेच कळेना ..अगदी मोडलेला ट्रक ,कसलही लाईट ची सोय नसलेला ,नंबर प्लेट नाही ,काचा फुटलेल्या आणि ड्रायव्हिंग च्या सिट जवळून पुढे जाताना वर पाहिलं तर ड्रायव्हिंग सिट रिकामी .............आणि आणि तेवढ्यात समोर खोल  दरी अगदी एक क्षणात गाडी ने जोरात वळण घेतलं आणि रस्त्याला लागली .....वाचलो ...पुन्हा दीर्घ श्वास ...मागे वळून ट्रक पहायचं धाडस नाही झाल पण तरीही हिम्मत करून पहिलं मागे फक्त अंधार होता जणू काही चंद्राने पण आमची साथ सोडलेली ..निशब्द होवून आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं ..की आपण जे अनुभवलं ते खरचं खर होत की भास काही कळत नव्हत ..नुसते प्रश्न थैमान घालत होते मनात . आमच्या मागे काही गाड्या होत्या घाटाच्या सुरुवातीला अचानक कुठे गेल्या ?...नाही हे असं काही नसतं मग माझे डोळे मला धोका देत असतील का ? ..मग या सगळ्यांनी पण तेच पाहिलं जे मला दिसलं ...!!
         ..पुढे दूरवर एक ढाबा दिसला .. अंग थरथर त होते ...मोठं धाडस करून चहा घेवू म्हटलं .आणि गाडी ढाबयाजवळ थांबली .आणि  चहा घेण्यासाठी एका कोपऱ्यात ली जागा बघून मुलांना मांडीवर घेवून बसलो .गावातली सात आठ लोक बोलत असलेली चर्चा  कानावर पडली,,,"कालच्या ट्रक अक्सिडेंट मधला माणूस नाही वाचला पण ट्रक तरी वाचायला पाहिजे होता " पुन्हा आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो ......
 ( स्वाती प्रशांत गुरव )

Sunday 16 December 2018

नाती ..
आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा बाळ म्हणून आपल्याकडं पाहिलं जात  ,थोड मोठं झाल्यावर पिल्लू ,सोनू ,चिकू , राजा ,राणी या नावाने बोलावतात ,आणखी थोड मोठं झालं की दीदी, दादा,ताई होतो ,नात्यांची वीण किती बदलत जाते ना ...वहिनी ,दादा,काका ,काकी ,मामा ,मामी यांची जागा आपण कधी घेतो कळताच नाही पण त्याबरोबरच टप्प्याटप्प्याने जबाबदाऱ्या पण वाठत जातात ..आणि आई ,बाबा या हाकेने तर जीवन बदलून च जात ,आपलं सगळं अस्तित्व या नात्याने पारखून निघत.पुढे आजी आजोबा नावांची ओढ वाट बघत असते ..आपले फक्त रोल बदलत असतात .माणूस तोच पण भूमिका बदलत जातात .अस खूप वेळा होत , आयुष्यात जेव्हा आपल्याला देणं असत, तेव्हा आपण न विचार करता सढळ हाताने  देतो ,पण जेव्हा आपल्याला घेणं असतं तेव्हा मात्र तेच दोन सढळ  हात , घेताना मात्र  थरथर त असतात ..( स्वाती प्रशांत गुरव )

Friday 14 December 2018

मातीतल्या आठवणी ...
      ठेविले अनंते , तैसेचि रहावे ...याप्रमाणे जे काही देवाने दिलेले आहे त्यात समाधान मानून जगणारे लोकं.दुष्काळी भाग ,कोरडी माणगंगा नदी,नदीच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असलेले छोटंसं गाव .ज्या गावाने माझ्या बालपणीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत .आई च्या हाताला धरून याच मातीत चालायला शिकले .याच मातीत खेळले ,पडले आणि उभी राहिले ..

       याच गावाबद्दल थोडासा लिहिण्याचा प्रयत्न ..
वडिलांची बदली झाली आणि आम्ही गोंदवल याला आलो,,त्यापूर्वी कधी न पाहिलेले गाव .पण या गावाने इथल्या मायाळू माणसांनी आम्हा कुटुंबीयांना कधी आपलंसं केल कळलच नाही  आणि जवळ जवळ १३ वर्ष इथे राहायला  मिळालं..गावातल्या मध्यभागी मारुती च मंदिर आहे , त्याच्या जवळच एका वाड्यात आम्हाला राहायला जागा मिळाली .तेव्हा कुठे मी नुसती चालायला शिकलेले ...आजही हे लिहिताना तो वाडा त्या खोल्या डोळ्यासमोर येतायत. मंदिराजवळच छोटीशी बालवाडी होती तिथे मी जाऊ लागले .खूप आठवण येते अनिता बाई ,देशपांडे बाई ,आणि डब्यातून मिळणाऱ्या सुकडीची .पुन्हा १ ली ते ४ थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळे तला प्रवेश .तेव्हा अपुऱ्या जागेमुळे आणि शाळा दूर असल्याने आम्ही राहण्याचे ठिकाण बदलले ..आणि पुन्हा माझी जिवाभावाची मैत्रीण मेघा  भेटली ..मग आमचं दोघींचं शाळेला रोज बरोबर जाणं .बरोबर अभ्यास कारण चालू झालं ..कायम सोबत असायचो आम्ही .पुन्हा ते दिवस जगायला मिळावे असच वाटतं  अगदी .पहिली ते चौथी चारही ईयत्तेत आम्हाला एकच बाई होत्या रेमने बाई ..अतिशय कडक ..पण आज जे आम्ही आहोत ते आमच्या बाई न मुळे च .. खूप भीती वाटायची शाळेला जायची ..पण सगळं वेळच्या वेळी पूर्ण करण ..अभ्यासाचं नियोजन करणं ,स्वच्छ ता आरोग्य सगळं सगळं बाई न मुळे कळलं ..आणि आजही त्यांनी सांगितलेलं जसच च्या तास आठवतंय ..बाई आठवड्यातून एकदा हस्ताक्षर च्या स्पर्धा घायच्या ..त्यात पहिला नंबर मिळण्याची अमाची कायम धडपड  असायची ..शाळेत गेल्या गेल्या पहिला तास शाळेच्या आवारातील स्वच्छ तेचा असायचं नंतर प्रार्थना ..आणि वर्षातून  एकदा दवाखान्यातील लोक आमची आरोग्य तपासणी साठी यायचे तेव्हा माझी खरी परीक्षा असायची .तेव्हा मी शाळेत जायला तयार च नव्हते खूप घबरायचे ... पप्पा नी घरापासून अगदी शाळेपर्यंत मारत मारत नेलेले ..बार्शी करांच हॉटेल होत चौकात तिथे खूप लोक असायचे ..पप्पा नी मारत मारत नेल्यामुळे परत मला तिथून जायला खूप कसातरी  वाटायचं ..आणि बाई न मुळे शाळेची कधी अवड निर्माण झाली कळलच नाही .शाळेजवळ च दवाखाना होता ,पप्पा दवाखान्यात X.ray techinichian असल्याने त्यांना गावात सर्व ओळखायचे . आणि त्यामुळे मी पप्पा ना खूप घाबरायचे .काही दिवसांनी दवाखान्यात क्वार्टर मधे राहायची सोय झाली आमची .. ५ ते १० वी शाळा बदलली ..तिथे नव्या मैत्रिणी मिळाल्या आणि नवे शिक्षक .शाळेची प्रार्थना ,P E चा तास ,विविध गुण दर्शन कार्यक्रम त्यात आमचा रमेश काका नी बसवलेला ...डान्स ..मेरे देश की धरती ...त्याचा रोज एक तास सराव असायचा . प्रियांका ,रुपाली पार्वती ,नयना यांच्या बरोबर केलेला अभ्यास ,खेळ ,स्पर्धा न मधला सहभाग ..सगळं आजही तसच आठवतंय ...शाळेचं स्टेज आणि तिथे मी १० वीच्या निरोप समारंभात केलेलं भाषण ,,शाळेचं परिपाठ म्हणयला जाताना थरथरणारे पाय ,हो आणखी एक आठवण म्हणजे करा टे क्लास ..पहिल्याच बेल्ट च्या साठी आम्ही सगळे द हिवडी ल गेलेलो ...आणि माझा तो दिवस माझ्या karate class cha शेवटचा दिवस ..कारण येताना चशम्याच्या फुटलेल्या काचा हातात घेवून रडत रडत घरी आलेले .९ मधे असताना कन्याकुमारी उटी म्हैसूर ची आमची ट्रीप .त्यासाठी पापा thank you .ata ठरवून पण अशी ट्रीप परत काढणं जमलच अस नाही . आणखी एक आठवण म्हणजे आमचे योगा चे क्लासेस ..पहाटे दवाखाना ते देवळापर्यंत पळत योगा च्या क्लास ल खांडेकर सरांकडे यायचो ..त्या वेळी त्या काळी योगासन ,आणि इंग्रजी या दोन्ही टोकाच्या गोष्टींमध्ये पारंगत असलेली व्यक्ती म्हणजे खांडेकर सर .. सर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद .
     गावाच्या नदीला कधीतरी येणारा पुर आणि पूर बघण्यासाठी जमणारी गर्दी ...तेव्हाच  काय तो गाव नदीच्या दोन्ही काठाला उभ राहायचा .गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भरणारी यात्रा ..आणि उंच दही हंडी .हे गावच वैशिष्टय .गावात होणाऱ्या नाट्यस्पर्धा ..त्याच श्रेय रमेश काका नाच ..मला घेतलेली नवीन सायकल आणि त्यावरून मी प्रियंका आणि उज्वला अगदी पळशी  पर्यंत गेलेलो .पार्वती रानातला खाऊ अगदी मायेने प्रेमाने आणायची आणि आम्ही ही आवडीने खायचो ..
   खरंच परत भेटेल का हे सगळं अनुभवायला ..परत मिळेल का शाळेतला तो बेंच , बळवडीतली डब्या तली सुकडी ...गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये या माझ्या मातीत जाण्याचा योग आला .. तेव्हा मी पाहिलेला गाव आणि माझ्या आठवणीतलं गाव यात खूप फरक होता ..शाळेची जीर्ण झालेली इमारत पण त्यावर लिहिलेलं राष्ट्रगीत अजूनही तसाच होत..दवाखान्याचा मैदान आणि ते मोठं झाड ज्याखली आम्ही दिवसभर खेळायचो ..सगळं मोडकलय पण तो उंच डेरेदार वृक्ष दवाखणाच्या आव रात आजही तसाच तटस्थ पने उभा आहे ...जुन्या आठवणी कवेत  घेवून...
 (गावाचे नाव .. गोंदवले तालुका माण जिल्हा सातारा ) स्वाती प्रशांत गुरव 

Tuesday 4 December 2018

अपेक्षांचं ओझ ...

    अपेक्षा हा शब्द एकटा असला तरी त्याच्यामध्ये खूप ताकद आहे .आणि मग त्याच्या मागे ओझ  हा शब्द लागला की मग झालाच ..अपेक्षांचं ओझं ...म्हणजेच थोडंसं निगेटिव्ह ,न पेलणार असं.
      अपेक्षा कुणी ,कधी ,कुणावर ,कुणाकडून, करायच्या याला बंधन नाही .लाहांनानी मोठ्यनाकडून खेळण्यांची  अपेक्षा .आणि मोठ्यांनी लहनंकडून अभ्यासाची ...काहीतरी चांगलं करण्याची  अपेक्षा,फक्त अपेक्षा आणि अपेक्षा .जग सगळं या अपेक्षांच्या ओझ्यावर दबून गेलंय .
        विद्यार्थी दशेतील काळ खर तर अतिशय छान मनासारखं जगण्याचा ..हवे ते निवडून त्याचा अभ्यास करण्याचा पण हा अपेक्षा शब्द मधे येतो ...आणि या विद्यार्थी दशेला वेगळं वळण मिळत .... मला माझ्या आई ने  सांगितलेआहे ...की  डॉक्टर हो ..किंवा वडिलांनी सांगितलं आहे इंजिनिअर हो .आणि त्यानुसार काही मुले अभ्यासाला लागतात ...पण मनात स्वतच्या आवडत्या विषयाची वेगळीच ओढ असते.गाण्याची आवड, नृत्याची आवड , चित्रकलेची आवड किवां भाषा विषय घेवून पुढे काहीतरी करायची इच्छा असेल तर ती बाजूला ठेवून मुले आई वडील जे सांगतात त्या दिशेला वळतात .पण त्यामुळे मागे राहतात ..आणि मनात नसताना , आवड नसताना केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण कोणतच करिअर नीट सांभाळू शकत नाही .
हे मुलांना खूप उशिरा कळून चुकत पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते ,जे आहे ते स्वीकारून आयुष्यभर जगावं लागत .
         आयुष्य म्हणजे म्हतलं तर तारेवरची कसरत आणि म्हतल तर मनमुराद जगण्याची संधी ..गरिबाला पोटाला मिळण्याची चिंता ,मध्यमवर्गीयांना मोठी स्वप्न पाहण्याची भीती ,आणि श्रीमंतांना घरातून बाहेर पडण्याची चिंता .. म्हणजे खर पाहिलं तर सुखी कुणाला म्हणावं .जो जे मिळाले आहे त्यात सुख मनेल तोच सुखी .मग आताच्या करीयर ची स्वप्न पाहणाऱ्या .. करिअर ल दिशा देवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उघड्या डोळ्यांनी जगाची स्थिती पाहा , आजूबाजूची  बदलती  परिस्थिती पहा आणि मग निर्णय घ्या डॉक्टर व्हायचं , इंजिनिअर व्यायच ,व्यावसायिक व्हायचं ..का जे आवडेल त्यात पुढे जाऊन त्यात जे मिळेल त्यात समधान मानून एक स्वस्थ ,निरोगी ,प्रामाणिक आयुष्य जगायचं .आहे त्या परिस्थितीत सकारात्मक विचार करून जीवनात यश मिळवा .जीवन जगत असताना ,यश मिळवत असताना ,अपयश दुखः अडचणी या जीवनात येणारच पण त्यावर  विचार करून ,चिंतन करून मार्ग काढणे गरजेचे आहे .
  ( स्वाती प्रशांत गुरव ) 

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...